Monday, January 10, 2011

समृद्ध वारसा..

भारतातील जातीव्यवस्था ही जगभरातल्या समाजशास्त्रज्ञांना बुचकळ्यात पडणारी गोष्ट आहे. अशा प्रकारची समाज रचना जगात कुठेही नाही. वर्गभेद आहे, धर्मभेद आहे, वंशभेद आहे, वर्णभेदही आहे पण जातीभेद जगात कुठेही नाही. जातीची नेमकी व्याख्या करणे अतिशय अवघड आहे. काही इतिहासकार म्हणतात याचे मूळ भारतीय चातुर्वर्ण्य व्यवस्थेत आहे. काही संशोधक मात्र जातीव्यवस्थेला चातुर्वर्ण्य व्यवस्थेपासून वेगळे मानतात.

जगात सर्वत्र उच्च नीचता आहे. असा एकही देश/प्रांत नाही जिथे उच्च नीचता नाही. कुठे वर्गयुद्ध आहे, कुठे पंथांमध्ये बेबनाव आहे. आणि अशा या भेदांच्या भिंती पार करूनच प्रगती साधता येऊ शकते यात काही शंकाच नाही.
पण विचार करा, समजा उद्या भेदांच्या सर्व भिंती कोसळून पडल्या सगळे समान झाले तर? सगळ्यांचा धर्म एक, वर्ण एक, जात एक, पंथ एक... आणि याचा परिणाम म्हणजे सगळ्यांचा एक आहार, एक विचार, एक मूल्ये, एक वेशभूषा, एकंच धार्मिक स्थळ.... बाप रे... असे जग किती भयानक असेल....सगळेच सारखे झाले तर माणसाच्या आणि मुंग्यांच्या जीवनात काय फरक राहिला?? 

भेद नष्टच झाले तर जग निरस आणि कंटाळवाणे होऊन जाईल. अशा जगात राहणे माणूस प्राण्याला अशक्य होऊन जाईल. आयुष्यातली रंजकता टिकवून ठेवण्यासाठी भेद आवश्यक आहेत.
सर्वजण समान आहेत यासारखे दुसरे भंपक वाक्य नाही. सर्वजण समान असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा निसर्गाचा सरळ सरळ अपमान करतो. निसर्गाने कोणत्याही दोन गोष्टी एकसारख्या ठेवल्या नाहीत. दोन व्यक्ती तर सोडाच पण पर्वत, नद्या, पाणी, झाडे, फुले, पाने सगळे काही वेगळे आहे. एक गुलाबाचे फूल आणि दुसरे गुलाबाचे फूल यामध्ये तंतोतंत साम्य कधीच सापडणार नाही. निसर्गाने प्रत्येकाला exclusive बनवले आहे. exclusive ला मला चांगला मराठी पर्यायी शब्द सापडला नाही. खरोखरच हाच शब्द योग्य आहे. एखाद्यात जे रसायन आहे ते दुसऱ्यात कधीच सापडत नाही. या नैसर्गिक वैविध्याचा अपमान करून सर्वजण समान आहेत असं उगीचच बोलण्यात काय अर्थ आहे? भेद ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे आणि त्याचा आदरच केला पाहिजे.

"समानता" जर कुठे आवश्यक असेल तर ती आहे संधी मध्ये. "समान संधी" हा एखाद्या विचारधारेचा पाया असू शकतो. धर्म स्वीकारण्याची, आपला व्यवसाय निवडण्याची, आपला जोडीदार निवडण्याची, आपला राजा निवडण्याची,रोजगाराची, शिकण्याची सर्वांना समान संधी असावी.  

भारतीय व्यवस्थेमध्ये प्रचंड जाती आहेत. आता जाती जातींमधील उच्च नीचता काढून टाकूया, मग काय दिसते? एक वैविध्याने नटलेला समृद्ध समाज. असंख्य रिती रिवाज असलेला..असंख्य वेगवेगळ्या पद्धतींनी नटलेला..इतकेच काय पण एकाच पदार्थ बनवण्याच्या शेकडो तऱ्हा असणारा अतिशय समृद्ध समाज. "आमचे ते सर्वोत्तम" हा दुराग्रह सोडला तर या वैविध्याचा आनंद लुटणे मुळीच अवघड नाही. एखाद्याच्या घरातला चिकन रस्सा अप्रतिम तर एखाद्याच्या घरात पुरणपोळी... कोणाकडे साधा मिरचीचा ठेचा सुद्धा वेगळा... गणपतीची आरास करायची प्रत्येकाची धाटणी वेगळी. मूर्तीच्या आकारात सुद्धा वैविध्य!

भारतीय जातीव्यवस्थेतून "आमचे ते सर्वोत्तम" आणि "आम्हीच दुसऱ्यावर वर्चस्व गाजवणार" या दोन प्रवृत्ती वजा केल्या तर हीच व्यवस्था समान संधींच्या पायावर उभी राहिल्यावर सर्वात जास्त समृद्ध आणि खऱ्या अर्थाने श्रीमंत ठरेल...!!! पण त्यासाठी आपल्या समाजातील  वैविध्याने नटलेल्या जातिव्यवस्थेच्या या समृद्ध वारश्यावर हजारो वर्षे हा साचलेला गंज साफ केला पाहिजे.
कदाचित या वैविध्यातूनच, हा समृद्ध वारसा टिकवण्याच्या जिद्दीतून खराखुरा एकोपा निर्माण होईल...व्हायला पाहिजे....!!!

4 comments:

  1. This was definitely written very thoughtfully. i'll agree to most of the poits.. tarihi..mala ha lekh thodasa ideal watla.. jari tyatle vichar patle tari te practical nahiet..he sagla khupch 'assume' karun lihlay..kinva asa zala tar changla hoil asa mhanlay.. which is true.. pan te honach khup awghad ahe..near impossible... of course, even i wud like to witness what u have mentioned..but i don't expect it!

    ReplyDelete
  2. a good read but i agree with avani that you've assumed certain things..

    ReplyDelete
  3. @ Avani
    It is true, that the concept is ideal...but only to some extent. I am sure, that what I have expected is nearly impossible on a larger scale. but it is very much possible at the individual level.
    I think, human being always tries to be ideal. Even a villain tries to be an ideal villain..! So I would say, trying to get ideal things is good...Go for it...!

    ReplyDelete
  4. I dunno.. I mean, trying to get ideal things is good or not is quite debatable! Vividhate madhun uchha neechata waja karna he hi titkach avghad ahe. And maybe, aplya samajaat jara jastach vividhata ahe, which makes it even harder to strike an equilibrium. Nevertheless, differences are natural and are to be accepted, if possible, respected!

    ReplyDelete