Friday, November 5, 2010

अंधश्रद्धेच्या विळख्यात...

"आदर्श" प्रकरणात अशोकरावांचे जे व्हायचं ते होवो... पण या प्रकरणामुळे किती गलिच्छ पद्धतीने काँग्रेस नेते वागत आहेत हे लक्षात येतं. काँग्रेस हा भारतातला सर्वात प्रमुख, सर्वात जुना आणि सर्वात ताकदवान पक्ष आहे. एखादा पक्ष भ्रष्टाचार,स्वार्थ आणि बिनडोकपणा या तीनही गोष्टी असूनही इतके वर्ष अधिसत्ता कशी काय गाजवू शकतो हे न उलगडणारे कोडे आहे... याचे एकमेव उत्तर म्हणजे भारतीयांची सडलेली मानसिकता. भारतीय अडाणी जनता काँग्रेसच्या बाबतीत अंधश्रद्धाळू बनली आहे. आणि फक्त अडाणी जनताच नव्हे तर शहरातले शिकले सवरलेले लोकही या बाबतीत अगदी अडाणी लोकांसारखे वागतात. राहुल गांधी याने मुंबईच्या लोकल मधून प्रवास केला, त्यासाठी तिकिटाच्या रांगेत तो स्वतः उभा राहिला या गोष्टींचे आपल्याकडे काय कौतुक... विरोधकही "ही तर स्टंटबाजी" असं म्हणत त्याची दखल घेतात. पण 'खासदार' असलेल्या राहुल गांधी यांना तिकीट काढायची काहीच गरज नव्हती, कारण खासदारांना लोकप्रतिनिधी या नात्याने लोकल रेल्वेचा प्रवास फुकट करता येतो....!!!! तर अशा बिनडोक माणसाला आपल्याकडे अंधश्रद्धाळूपणे देशाचा भावी पंतप्रधान म्हणलं जातं. विरोधकही तेवढेच निर्बुद्ध असल्याने त्याच्यावर टीका करत त्याला महत्व देतात.
 
काँग्रेस ही देशाला लागलेली कीड आहे आणि ती समूळ नष्ट करायची गरज आहे. काही लोक म्हणतील की मूळ काँग्रेस चांगला पक्ष आहे. त्यातल्या वाईट लोकांना काढले म्हणजे झाले. पण हे (असल्यास!)चांगले लोक जे काही टिकून आहेत, ते इतके मूर्ख आहेत का की त्यांनी अजूनही काँग्रेस सोडू नये?! काँग्रेस असं मी जेव्हा म्हणतोय तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला मी मुळीच वेगळं मानत नाही. एकातूनच दुसरा तयार झालाय म्हणल्यावर सगळे दोष याही पक्षात आहेतच.

माझा एक मित्र काँग्रेसच्या "हाय कमांड" ची फार स्तुती करतो. 'सगळे फार हुशार लोक आहेत, ते सरकार बनवतात दिल्ली मध्ये, त्यामुळे देश चांगल्या हातात आहे.' अशा काही त्याच्या भाबड्या समजुती... मुळात आपल्या देशात लोकशाही आहे, कितीही "हाय कमांड" वगैरे म्हणलं तरी लोकसभेत बसणारे आपल्या पक्षाचे २०० खासदार आणि वेगवेगळ्या विधानसभांमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणारे हजारो लोकप्रतिनिधी  हेच सर्वात महत्वाचे आहेत याची जाणीव त्यांनाही आहे. तशी ती नसती, आणि क्षणभर हेही गृहीत धरू की खरोखरच ते लोक चांगले आहेत, तर त्यांनी अशोकरावांची केव्हाच हकालपट्टी केली असती. पण आज अशोक चव्हाण यांच्या पाठीशी काही आमदारांची आणि समर्थकांची ताकद उभी आहे. प्रणव मुखर्जीला काही का वाटेना, ही शक्ती नजरेआड करणे अवघड आहे. विलासराव देशमुख राहुल गांधींच्या खास मर्जीतले नाहीत, पण महाराष्ट्र विधानसभेत त्यांना असणारा आमदारांचा पाठींबा हा इतका महत्वाचा आहे की केंद्र सरकार मध्ये त्यांचा पुनर्वसन करणं काँग्रेस "हाय कमांड"साठी क्रमप्राप्त होतं. थोडक्यात लोकशाही राज्यात "वरती" बसलेले किती चांगले आहेत याला किंमत नाही. चांगुलपणा खालपासून असायला हवा. आणि तसा तो नसेल तर निदान वरच्या पातळीवरच्या नेत्यांमध्ये कणखरपणा हवा. सोनिया गांधी/ राहुल गांधी हे लोक एवढे कणखर असले पाहिजेत की जे लोक भ्रष्ट असतील त्यांची हकालपट्टी केली पाहिजे. ज्या दिवशी हे घडेल त्या दिवशी माझे मत मी काँग्रेस पक्षाला देईन.

काँग्रेस पक्ष कुठलेही कणखर पाऊल घेण्याच्या दृष्टीने पूर्णपणे असमर्थ आणि दुबळा आहे. अशा दुबळ्या पक्षाला मी माझे मत का द्यावे? केवळ पंतप्रधान "पी एच डी" असावा म्हणून पुण्यातून उभ्या असलेल्या कलमाडीला मी मत द्यावे हे माझ्या तरी विवेक बुद्धीला पटत नाही.

असंख्य भ्रष्टाचाराची आणि गैरव्यवहारांची प्रकरणं बाहेर येत आहेत. 'लावासा' पासून ते आता 'आदर्श' पर्यंत. सगळीकडच्या चिखलात काँग्रेस चे लोक पूर्णपणे बरबटलेले आहेत...कलमाडी, शीला दीक्षित, आणि आता अशोक चव्हाण सगळे "हाय कमांड" समोर रांगेत उभे आहेत... यांच्यावर काही ठोस कारवाई (निलंबन वगैरे पोकळ काही नको..ठोस कारवाई हवी..!) होते की नाही हीच वाट पहायची...

5 comments:

  1. baaapre.. bhitich watli.. kevdha kavlays..ani kiti te tavatavani bolna! tuza rag samarthaneey ahe....!

    ReplyDelete
  2. hehehe.... aaj congress baddal lihla ahe... ata ekek karun saglyach political parties baddal lihnar ahe...!!!! :)

    ReplyDelete
  3. Saglya pakshanvar?! Lihun hoeeparyant mhatara hoshil!!

    ReplyDelete
  4. are saglya mhanje main saglya... Congress zala... ata BJP, mag NCP, mag Shivsena, mag MNS, mag faltu parties baddal saglyanna milun ek...

    ReplyDelete
  5. good job tanmay, i hope your blog reaches the "kidleli" high command, to let them know that youth is not to be fooled by stunts like "garibaghari bhakari khaun yena" or "konalatari (camera samor astana ch) aai mhanna n camera firlyavar path firavana" etc

    ReplyDelete